Skip to main content

. . . आणि देश नादी लागला


. . . आणि देश नादी लागला
भारत हा जागतिक पातळीवर नेहमीच काही न काही हास्यास्पद करून स्वत:ची फटफजिती  करून घेत असतो.याला देशातील भोळीभाबडी (मेंढरं) जबाबदार आहेत तसेच काही स्वत:ला उच्च शिक्षित, सुसंस्कृत समाज्नारेही आहे. आणि त्याचे मूळ त्यांच्या प्रतीगामित्वात आहे. धर्माच्या नावाने राजकारण हे गेल्या कित्येक शतकांपासून इथे सर्रास चालू आहे. देव या संकल्पनेला त्याच्या काल्पनिक कोपला इथला माणूस गांगरून आहे. त्याला सद्सद्विवेक सुचू नये अशी इथल्या सनातन्यांनी व्यवस्था करून ठेवली आहे. आणि एकदा का या बागुलबुव्यांची भीती घातली कि सारेच मार्ग करायला मोकळे होतात. हा इथला शिरस्ता. आमच्या प्रबोधनकारांनी इथे रक्त आटवलं त्याचा येत्या वैज्ञानिक युगात विसर पाडायला लावणे हे इथल्या व्यवस्थेचे वर्तमान  दुष्कृत्य. आमची परंपरा ही फार समृद्ध आहे . बुद्ध हे या परंपरेचे उद्गाते आहे. त्यांनी धर्म ही सम\न्कल्पना न सांगता "धम्म" ही जीवन जगण्याची समृद्ध संकल्पना सांगितली. तत्कालीन समाज व्यवस्थेतील विषमता नष्ट व्हावी हा त्या मागचा  उद्देश होता. त्या धम्मात बहुजन हिताय;बहुजन सुखाय, मानव कल्याण, प्रेम, अहिंसा, समता, न्याय इ. मंगलमय  जीवनाचा मार्ग आहे. जो या सृष्टीतल्या प्रत्येक जीवाला जगण्याचा जन्मदत्त अधिकार देतो. त्याचेही इथल्या नराधमांनी राजकारण करून समाजातील सुज्ञान्सकट झिंगायला भाग पाडले. या महा करुनिकाने "प्रतीत्यसमुत्पद" कार्यकारण भाव हा जगातल्या प्रत्येक शोधाचे सूत्र मांडले. त्या वैज्ञानिकाने आन्विक्षनालाही थारा दिला नाही, तर्क, अनुमान, कल्पना-चमत्कार या सर्वांना माणसाच्या सर्जनशील मेंदूतून हद्दपार केले. आणि परम निष्कर्षातून ठोस पृराव्यानिशी सिद्ध होणा-या तात्यांना जगासमोर ठेवले. ही आमची खरी परंपरा होय.
आज देश्यात याच्या उलट परिस्थिती आहे ती हास्यास्पद आहे . देश पुढे जात आहे. . .  असे एका बाजूला जागतिक पातळीवर स्तुती करवून घेत स्वत:ची शेखी मिरवून घेण्यात धन्यता मानणारे अंधश्रद्धेच्या विळख्यात गुरफटून आहे . (सगळेच तसे नाही अपवाद असतात हे गृहीत धरून. . . )
देशातील आंधळी प्रौढ जनता :  या देश्यातील प्रौढ जनता म्हणजे आता कुठे स्थित पोहचले आहे त्यांना इथल्या . . .कोटी देवतांचे पूजन करता करता आयुष्य निघून गेले. आता उर्वरित आयुष्य टाळकुटेपणात घालाविण्या शिवाय पार्याय नाही .असे काही उपद्व्यापी प्रौढ अजूनही श्रुतिस्मृती पुराणोक्त वागण्यात धन्यता मानतात आणि देश्याच्या वर्तमान पिढ्या नासवतात.
मध्य वयस्क पिढी : अधात नाही आणि मधात नाही: देशाचा काना असणारे हे कृतीशील पिढी; म्हंटल तर काहीही करू शकेल मात्र यांच्या मेंदुंवर पिढ्यान पिढ्या जळमट, आणि झापड बांधले आहे ते नवे स्वीकारीत नाही आणि जुने सोडत नाही "धरलं तर चावते आणि सोडले तर पळते" अशी गत या पिढीची आहे.
सध्याची तरुण (वयाने) पिढी:  ही पिढी म्हणजे देशाचे आधारस्तंभ असतात कुठल्याही देशाला त्यांचा आधार वाटावा अशी मनगटात नवा दम असणारी ही युवा पिढी. मात्र त्यांच्यावरही परंपरागत संस्कार करून त्यांच्या डोक्यातून विज्ञान गारद करण्याचे व त्यांचा अनुचित गोष्टीसाठी वापर करून घ्यायचा ही इथल्या प्रस्थापितांची खेळी असते. आणि ते सहज त्याला बळी पडतात कारण अति उत्साह या पिढीला असते, रक्त सळसळते असते, विवेक नसतोच, आकलन कमी असते अभ्यास कमी असतो, प्रगल्भता नेमकी यायला सुरवात होते असा त्यांचा काळ असतो आणि याचा फायदा स्वार्थी वर्ग निशितच घेत असतात त्यांचा वापर होत आहे हे त्यांना काळातही नाही कारण ते बेभान वा-या सारखे असतात. आणि पिढ्या गारद होतात. त्यांच्यवर जाणीवपूर्वक संकटे निर्माण करून बेरोजगारी, स्पर्धा निर्माण करून त्यांच्या असहायतेचा फायदा करून घेणे अश्या समाज विघातकांना सोपे जाते. 
येणारी पिढी :  जी आत्ता कुठे या जगात आली अशी लहान मुले. या २१ व्या शतकात जन्माला आली त्यांना समजावणे भल्या-भल्यांना शक्य होत नाही. तीन-चार वारशाच बाल झाले नाही कि त्याचे बोटे सराईतपणे संगणकावर आपोआप फिरायला लागतात. त्याला काल्पनिक गोष्टी बुद्धीच्या पातळीवर पटत नाही. आपल्या लहानपणातील बागुल्बोवाच्या गोष्टी सांगितल्या तर तो म्हणतो 'कुठे आहे तो त्याला दिसत क्षणी मी गोळी घालीन. . .' यावर त्याचा बाप आणि आजोबाही निरुत्तर होतात.
हे सगळ सांगण्याचा माझा उद्देश एवढाच होता की, वरील विश्लेषणावरून देशाची प्रगतीची अपेक्षा कोणाकडून करावी? भारत उत्साव प्रीयातेच्या विळख्यात सापडून त्याचे प्रगतीचे लक्ष दुर्लक्षित केले. आम्ही जगाला मातीचा गणपती दुध पितांना मोठ्या दिमाखदार पद्धतीने दाखवून स्वत:ची नामुष्की केली, खैरलांजी सारखे अक्षम्य, निर्घुण कृत्य जगाला दाखवून दिले, राजस्थानात प्रशासकीय अधिका-यांसमवेत राजकारण्यांच्या उपस्थित २१ व्या शतकात 'सती' ला जिवंत पेटवून दिले, तिचे मंदिर उभारले. , अनेक दुर्घटना होत असतानाही लोक देवाच्या यात्रेला वारीला जीव धोक्यात घालून नित्य नेमाने जातात. याचा अर्थ त्यांचे पापकृत्य वाढले आहे असा होतो.

. . . . आणि आता हास्यास्पद म्हणजे योगगुरू म्हणविना-या रामदेव मागे लागलेल्या मेंधारांचा हशा झाला हेही जगणे बघितले. आता वेळ आहे अण्णा हजारेंची. . . .
अण्णांचा उपोषणाचा मार्ग बेकायदेशीर आहे आणि त्यांच्या मागण्याही देशाच्या संविधानाच्या कक्षेत बसत नाही प्रतिसरकार अनु पाहण्याचा त्यांच्या समर्थकांचा डाव आहे हे स्पष्ट दिसत असतानांही आमची मेंढरांची जात मागोमाग जावून दरीत कोसळत आहे. देशाचे प्रतिनिधी संसदेत कुणी पाठविले? ते जर भ्रष्ट  निघाले त्याला जबाबदार कोण? याचे प्रत्येकांनी आत्मपरीक्षण केले तर आपण हेच उत्तर मिळते मग आपणच भ्रष्ट असू तर देश कसा सोज्वळ राहील हा साधा प्रश्न आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री आपले प्रतिनिधी आहे ते देशाच्या हिताचे कायदे दोन्ही सभागृहाकडून संमत करून त्याचे कायद्यात रुपांतर करतील. हे इथल्या वरील पिढ्यांच्या लोकांना काळात नाही की जाणूनच ते कळवून  घेत नाही. अण्णांच्या उपोषणात असणा-या एकालातरी " लोकपाल" काय आहे माहित आहे काय? अण्णांचा लोकापालाचा ड्राफ्ट जनतेला माहित आहे काय? अण्णा टीमने "भ्रष्ट्राचार" या गोंडस संकल्पनेचा दुरुपयोग करून इथल्या जनतेला फसविले आहे हे इथल्या जनतेला अण्णांचा रामदेव झाल्यावर कळेल काय?  लोकशाही मार्गाने 'हुकुमशाही" येत आहे म्हणून सर्व कंगोरे तपासून देशाची सुसूत्रता, सहिष्णुता आजवर टिकवून ठेवणारी "राज्यघटना" बदलता येणे दुरापास्त असल्याने संविधानाच्या वरची प्रतीव्यवस्था निर्माण करणे इथल्या प्रतीगाम्यांचे लक्ष्य आहे. हे सुजानांनो लक्षात घ्या. आणि सावध राहा. . .
टीप : अण्णा हजारेंना देशाचा भ्रष्ट्राचार समूळ नष्ट करायचा असेल तर आंदोलन करावे मात्र 'लोकपाला'साठी नव्हे "व्यक्तिगत उत्पन्नावर प्रतिबंध" असणारा कायदा देश्यात आणावा यासाठी. व्यक्तिगत उत्पन्न जर एका व्यक्तीसाठी ५० लाख ठेवले तर त्यापेक्षा अधिक कमविण्याचा moh कुणालाच होणार नाही पर्यायाने भ्रष्ट्राचार आपोआपच नष्ट होईल इतके साधे गणित अण्णांना कळू नये. या देश्यात अब्जोपती एका बाजूला आणि दुस-या बाजूला दोन वेळेचे अन्नही मिळत नाही अशी आर्थिक स्थिती आहे कारण भांद्वाल्दारांकडेच भांडवल जाते हे साधे समीकरण आहे . तेव्हा गांभीर्याने वाचकहो विचार करा. . . .

प्रा. डॉ.पद्माकर तामगाडगे,
मुंबई. 


Comments

  1. 2011 cONGRESS
    1-Hasan Ali Khan scandal
    2-Indian Black Money in Swiss Banks
    3-Bellary mines scandal

    2010 congress
    1-2G spectrum scam and Radia Tapes Controversy
    2-Adarsh Housing Society scam
    3-Commonwealth Games Scam
    4-2010 housing loan scam in India
    5-Belekeri port scam
    6-Lavasa Scandal
    7-Uttar Pradesh Food Grain Scam
    8-Andhra Pradesh Industrial Infrastructure Corporation Controversy
    9-Indian Premier League Cricket Scandals


    2009 cONGRESS
    1-Madhu Koda mining scam
    2-Satyam scandal
    3-The 25,000 Crores Vasundhara Raje Scindia Deendayal Upadhyay Trust land scam [1]

    2008 cONGRESS
    1-Cash For Votes Scandal
    2-Pune billionaire Hassan Ali Khan tax default [2]
    3-The Satyam scam [3]


    2007 cONGRESS
    1-Mumbai Attacks

    2006 cONGRESS
    1-Stamp Paper Scam
    2-Kerala Ice Cream Parlour Sex Scandal
    3-Scorpene Deal Scam[4][5]
    4-Navy War Room spy scandal (related to Scorpene Deal Scam)

    2005 cONGRESS
    1-Oil-for-food programme scam (Natwar Singh)

    (((((((((((((( 2004 Bartiya

    1-Gegong Apang PDS Scam

    2003 Janata
    1-Taj corridor scandal
    2-HUDCO scam[6]

    2002
    1-Kargil Coffin Scam

    2001 Party ( in 5 year only 7 scam )
    1-Ketan Parekh securities scam
    2-Barak Missile Scandal
    3-Calcutta Stock Exchange Scam )))))))))))

    1997 cONGRESS
    1-Sukh Ram telecom scam
    2-Hawala Scandal

    1996 cONGRESS
    1-Bihar fodder scam
    2-Sukh Ram Telecom Equipment Scandal
    3-C R Bhansali Scam

    1995 cONGRESS
    1-Purulia arms drop case
    2-SNC Lavalin scandal
    3-Purulia arms drop case
    3-Telgi scam


    1992 cONGRESS
    1-Harshad Mehta securities scam
    2-Palmolein Oil Import Scam, Kerala


    1989 cONGRESS
    1Bofors Scandal


    1982 cONGRESS
    1-Cement Scam involving A R Antulay


    1971 cONGRESS
    1-Nagarwala Scandal


    1957 cONGRESS
    1-Haridas Mundhra scandal

    kab tak lutenge yaaar......ye ek haaath se kitani baar chanta khayenge yaaar. jaago india jaaago.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

महिला सक्षमीकरण सुरु आहे. . .

|| सृजनवेध || महिला सक्षमीकरण सुरु आहे. . . - डॉ. पद्माकर तामगाडगे महिला सक्षमीकरणाची प्रक्रिया केव्हा पासून सुरु झाली ? याचा विचार केल्यास. लगेच ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आठवतो आणि त्याच बरोबर आठवतो त्या घटनेमागील इतिहास. क्लारा जेटकिन या रूसी महिलेने सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला अधिवेशनाचा प्रस्ताव ठेवला होता . दर वर्षी ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जावा. तिने जगातील सर्व महिलांना आवाहन केले आणि पुरुष आणि महिलांमध्ये कुठल्याही प्रकारची दरी निर्माण होऊ नये. जर पुरुष झगडा करीत असेल तर महिलांनी शांत राहून सामंजस्याने विचार करून, शांतपणे लढावे. आणि मग १९११ पासून १९१५ पर्यंत सातत्याने ८ मार्च हा महिला दिवस म्हणून जगभर साजरा केला गेला. महिलांना संगठीत करण्यासाठी सेंट पीटर्सबर्ग शहरात ‘राबोनित्सा’ पत्रिका काढली गेली. आणि इथूनच महिलांवरील होणारे अन्याय अत्याचार, असमानता यांच्या विरोधात एक सक्षम नेतृत्व उभारल्या गेले. पहिल्या महायुद्धातील कालावधीत ओस्लो(नार्वे) मधील महिलांनी युद्धाचा निषेध दर्शविला, रशियन क्रांतीची सुरुवात ८ मार्च १९१...

ब्रेस्ट टॅक्स आणि नांगेली

*"Breast Taxes and Nangali via Sunny Leone"* singing the praise of our Prosperous culture to telling the pride of our traditions our throat does not dry up. And we never stoop. From our maternal culture to the advertising hub take a snap oh good man! Where was the Left's strong woman empire,  and as well there are also the devotees of Sunny Leone. There is worship of mother-goddess.  And at the same they are sucking  the mother honour at every square.  And Empire of Travancore drew up the Breast tax in the name of Mulkkram. And in the history of Kerala Nangeli go to closed one practice permanently the breast will not keep open and Taxes will not be taxed On the basis of breast size. She Cut the breast and keeping into banana leaf. She maintains the honors of feminism.  Kicking out on the orthodox end. Leone ,do you get some insight? You, you are the Google Search of the Year. and Best Porn star as well. Your brewing business reached to the top. Ungrateful histor...

अचल चेतनागृह : राजगृह -डॉ. पद्माकर तामगाडगे

अचल चेतनागृह : “राजगृह” “Education is not preparation for life: education is life itself.” John Dewey डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा आयुष्यपट पहिला तरी जगातील प्रत्येक माणूस दिपून जातो असा लख्ख जीवन प्रवास जगातील अपवादात्मक विभूतीचाच असेल! किंबहुना फक्त डॉ. बाबासाहेबांचाच असेल... आयुष्यातील एकेक घटना आणि त्या घटना-प्रसंगांना येणारे अवघड वळण, आयुष्याच्या पावलोपावली येणारा नित्य संघर्ष. अस्पृश्यतेच्या सावटाखाली जगतांना येणाऱ्या अपमानाची झळ सोसत सर्वोच्च स्थानी पोहोचण्याचे परम ध्येय. उजेड मागत फिरणाऱ्या कफल्लक पिढ्यांना त्यांच्या झोळ्या लख्ख प्रकाशाने भरून काळोखाला प्रकाशमान करणारा हा महासूर्य. एकाच आयुष्यात अलौकिक म्हणावे, जादुई म्हणावे असे कार्य या महामानवाच्या हयातीत त्यांनी केले आहे. त्यांच्या उत्तुंग कार्याचा, व्यक्तिमत्वाचा वेध शब्दात पकडता येईल असा शब्दच कोणत्या भाषेत उपलब्ध नाही. अशाच एका पैलूचा या निमित्ताने धांडोळा या लेखाच्या निमित्ताने घेणार आहोत. महामानव डॉ. बाबासाहेबांचे एकूण आयुष्य पहिले तर प्रत्येक गोष्टीसाठी धडपड आहे. कोणतीच गोष्ट त्यांना सहजासहजी प्राप्त झाली नाह...