Skip to main content

Posts

Showing posts from May, 2011

देश वाचला पाहिजे

देश वाचला पाहिजे   टमरेलात  पाणी भरून परसाकड जातो तवा पानटपरीवरच्या  एफेमवर दिल्ली केंद्राच्या बातम्या. . . "देशाच्या आर्थिक चलनवाढीत दोन अंकी वाढ" म्हणजे नेमकं काय हो भौ ? टेक्नोलॉजी का फेक्नोलॉजी विकसित झाली म्हणजे काय हो भौ ? च्यायला सरकार बी च्युत्याच हाय. . . तो ओबामा का कोण येऊन गेला त्याचा गाव कोणता हो भौ ? कम्प्युटर-फाम्प्यूटर का थे वावराच्या कामाचा मिशिन हाय ? तुम्ही शिकले सावरले म्हणून इच्यारतो भौ !                                   सेझ-फेज कायले लावून खाते भौ ? थे जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण हे का नवं गजकरण हायेत ? कंबर मोडीच्या पाल्यान पार पळते म्हणावं लय जालीम रस त्याचा. जखमेवर लावला का जीव जाते पण गुण येते. नाही का भौ ? आपल्या देशाले वाचवला पाहिजे का न्हाय  भौ ?     पद्माकर तामगाडगे, मुंबई

अस्वस्थ भारताचे चित्र . . .

  अस्वस्थ भारताचे चित्र . . .   मी अस्वस्थ भारताचे चित्र, उघड्या डोळ्यांनी पाहतो. . . तरुणांच्या अस्वस्थ गोंधळाला पाहतो, पालकांच्या केविलवाण्या धडपडीला पाहतो, आणि अस्वस्थ भारताचे चित्र रेखाटतो.   इथे प्रत्येकच श्वास अस्वस्थ. . . श्रीमंत-गरीब,  स्त्री-पुरुष, शोषक-शोषित, भांडवलदार-मजूर, शिक्षक-विध्यार्थी, अधिकारी-कर्मचारी, सरकार-शेतकरी, अन~ खाऊन न पचलेला ढेरपोट्या आणि उपासने खपाटीला पोट गेलेला. . .   सत्तेत असणारे सत्ता टिकवण्यात, सत्तेत नसणारे सत्ता काबीज करण्यात जीवाचे रान, धनाची खान, अपराधाचे अगणित बाण, लुंगे सुंगे, पोटाची थाळी, चोरी मारी, धावा-धाव, अफरा-तफर, वाट दिसेल पळ सुसाट,  अस्ता-व्यस्त, रक्तपात, चामडी सोडा-अवयवाचा गोळा, अस्वस्थ भारताचे चित्र . . . .. . माणूस उध्वस्त. . . .   ---------प्रा. पद्माकर तामगाडगे, मुंबई ---------

"वाचन संस्कृतीचे बदलते संदर्भ"

" वाचन संस्कृतीचे बदलते संदर्भ "            vktps ;qx Li/ksZps ;qx vls vki.k ckg;kRdkjh o`Rrhus Eg.krks i.k Li/kkZ dq.kkph \ d”kkph \ o dk \ ;kps mRrj “kks/kk;P;k dpkV;kr dq.khgh iMrkauk fnlr ukgh- 21 os “krd oSKkfud] HkkSfrd] Økarhus u[kf”k[kkar jljlysys vkgs- ek= lax.kd] eksckbZy] eksBeksB;k vkS|ksfxd laLFkk] R;kaps O;koLFkkiu dkS”kY;] eksBeksB;k bekjrh] uouohu “kks/k o R;kpk >ikV;kus tiekilkr okij g;k lxG;kp ckch lkaÁr ;qxkr loZp Fkjkrhy O;fDrauk letwu ?ks.ks vfoHkkT; >kY;k vkgs-ifj.kker% gh lxGh vk/kqfudrk Hkkjrklkj[;k [ksM;krhy [ksMwrki;Zar iksgpsy dk\ vlk Á”u mifLFkr gksrks-           egkRek xka/khauh ^[ ksM;kdMs pyk*]^[ksMs Lo;aiw.kZ cuok* vlk lans”k fnyk gksrk ek= iqjksxkeh Eg.kfoY;k tk.kkÚ;k egkjk’VªkP;k vusd nwxZe Hkkxkr ekulkyk ?kkcj.kkjh vkfne ekula vktgh jkukoukr daneqGs [kkÅu txrkgsr- ;kdMs “kklukps o turspsgh y{k ukgh- R;kps iquoZlu d:u R;kaP;k iq<P;k fi<hykrj...

पानीपतचा पुन:प्रत्यय : `ऐसे वर्तमान'

पानीपतचा पुन:प्रत्यय : `ऐसे वर्तमान' मराठी नाट्यचळवळ सद्या हलक्या-फुलक्या विनोदी नाटककारांच्या गर्दीच्या प्रेक्षकांना ओढून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच नुकताच `ऐसे वर्तमान' सारखे ऐतिहासिक, परंतु स्वतचं वेगळेपण घेऊन येणारे नाटक रंगमंचावर आले. 14 जाने. 1761ही काळाची नोंद कधी न मिटणारी आहे. `पानीपता'वर हजारो माणसांच्या रक्ताचा सडा पडला. तिथे अनेक शूरविरांना वीरगती मरण प्राप्त झाले. भाऊसाहेबांपासून अनेक थोरामोठ्यांनी प्राणपणाने झुंज दिली. त्यातील मोजक्याच म्हणजे विश्वासराव, दत्ताजी, जनकोजी शिंदे, मल्हारराव, मेहंदळे, पुरंदरे इ. नावेच फक्त इतिहासाला ज्ञात आहे. इतिहासाने आमच्यापर्यंत हीच शूरांची नावे पोहचविली. परंतु सैन्याच्या सर्व गरजा पुरविणाऱया बारा बलुतेदारांना त्यात स्थान कुठे आहे?  त्यांचाही या लढवय्यांच्या शौर्या इतकाच वाटा आहे. तरीही त्यांचा साधा नामोल्लेख आढळत नाही. इथल्या समाजव्यवस्थेने इतरांना शस्त्र धरण्यास बंदी केली; म्हणून काय बहुजनांतील एकलव्यांच्या गुणांना, कौशल्यांना दाबून ठेवता येईल काय? इथल्या शूर मर्दांच्या रक्तातच असलेल्या वीररसाचा इच्छित प्रसंगी ते वापर करत...

मी नव्या पिढीचा शिलेदार

मी नव्या पिढीचा शिलेदार मी नव्या पिढीचा शिलेदार - प्रचंड स्पर्धेच्या लाटा थोपवणे हे माझे कर्तव्य आहे जुन्यांचे जनुक जिवंत ठेवण्याच्या तकलादू धडपडी प्रतिक्रांती करण्याचे नाना मनसुबे , कट ओळखणे , हे माझे कर्तव्य आहे . धर्माचे राजकारण नव्या पिढीला भोवत नाही " कन्फ्युज एंड रूल " चा नवा मंत्र आणलाय आता सध्या   थोडा फावला , मात्र सत्तेसाठी फोल मला हा गोंधळ सावरला पाहिजे हे माझे कर्तव्य आहे . धर्मांधतेचा नियोजित कट करणा - या देशद्रोह्यांना वाचक बसावा असा कानमंत्र नव्या पिढीला द्यायला हवा नाहीच ऐकलं तर . . . रक्ताचा स्फोट मंगतातून झाल्याशिवाय देशद्रोह्यांचे मूळ नष्ट होणार नाही " हि मुले उखडून फेका " हि ललकारी देणे माझे कर्तव्य आहे . माझ्या येणा - या सळसळत्या भविष्य - जनमान्य आधीच गर्भ काळी कुस्करणारा , मेळघाटातील कुपोषित समाज निर्माण करणारा इतिहास ज्ञात ठेव , भर सभेत सत्य सांगणारा चार्वाक खाक केला सुतराम पुरावा हाती लागू नये म्हणून पानं नं पान भस्म केले . त्रिपिटकाचे प्...

"आंबेडकरवाद" वादच नको?

" आंबेडकरवाद " वादच नको ? आंबेडकरवाद" म्हणजे धर्म जात पंथ या सगळ्यांच्या अतीत जाऊन. अखिल विश्वाच्या मानवाच्या कल्याणाचा नवा जीवन मार्ग आहे. भारताच्या दृष्टीने जर त्याचा विचार केला तर साठोत्तरी समाजातील जे काही स्थित्यंतरे झाली आहे ती केवळ आणि केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच   झाली आहे.   ग्रामीण समाज असो की शेतकरी, आदिवासी, शोषित-पिडीत, स्त्रिया इ. समाजातील तत्कालीन वंचित व दुर्लक्षित घटकांना या समाजव्यवस्थेने सर्व घटकांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले. परंतु या घटकांना त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार आजपर्यंत काळत नव्हता? कळला तरी व्यवस्थेच्या तटबंदिमुळे त्यांचे शब्द मुके होते. हीवास्तवता कुणीही नाकारू शकणार नाही. अतिशय दुर्लक्षित असणा-या अतिदुर्गम भागात शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नव्हत्या, रस्ते, वीज, या भौतिक बाबी तर दूरच सध्या मुलभूत जीवनावश्यक गरजांचीही मारामार होती. या सगळ्या घटकांना स्वत्वभान नव्हते. ते स्वतःवर होणा-या अन्यायाला स्वतःच्या कर्माचे फळ समाजत होते. परिणामतः शतकानुशतके गुलामिचीच अवस्था या वर्गाची राहिली आहे. ...