Skip to main content

कवितेचा जन्म?

कविता साहित्य प्रकार

 “Read not to contradict and confute, nor to believe and take for granted, nor to find talk and discourse, but to weigh and consider” -Francis Bacon (1561-1626)
“प्रतिवाद करण्यासाठी म्हणून किंवा खंडन करण्यासाठी म्हणून वाचन करू नका किंवा विश्वास ठेवण्यासाठी म्हणून किंवा गृहीत धरण्यासाठी म्हणून किंवा चर्चा करण्यासाठी किंवा विवेचानासाठी म्हणून देखील वाचन करू नका. तर वाचन करा समर्थ होण्यासाठी म्हणून, स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी म्हणून.”
-फ्रान्सिस बेकन(१५६१-१६२६)

माणसाला जशी आपली बोलीभाषा आपल्या सहवासातून अर्जित होत असते मात्र ती होत असतांना त्याला नकळत ती अवगत होते. जाणीवपूर्वक ती शिकावी लागत नाही. तसेच जगभरातील साहित्यात कविता हा साहित्य प्रकार रुजलेला दिसतो. मराठी आणि भारतीय साहित्यातही कविता हा साहित्य प्रकार प्राचीन काळापासून रुजलेला आहे. त्याचे मूळ शोधल्यास ते आपल्याला पौराणिक-महाकाव्य इत्यादींच्या ग्रांथिक अवशेषात सापडतात. मात्र तिथेच शोधाचे मार्ग अडकवून संशोधनाचे मार्गाच खंडित झाल्याचे भास होऊन आपला पुढील शोध संपवतात. तरीही एक प्रयत्न केल्यास असे दिसते की या महाकाव्यातील श्लोकात आलेल्या कारीकेच्या अनुषंगाने शोध घेतल्यास कवितेचे मूळ शोधण्याचा नव्याने प्रयत्न होऊ शकतो.
कविता आणि समीक्षा यांचा शोध घेतांना या पृथ्वीतलावरील पहिली कविता व त्या कवितेची पहिली समीक्षा कोणती? याचा शोध घेतल्यास सदर आख्यायिका सांगितली जाते. ती अशी,
“वाल्मिकी ऋषी भारद्वाज नावाच्या शिष्यासह तमसा नदीकाठी स्नानसंध्येस योग्य जागा शोधात होते. त्या वेळी त्यांना एका झाडावर एक कामासक्त आणि मैथुनमग्न असे क्रौंच पक्ष्याचे जोडपे दिसले. तेवढ्यात जवळपास उभ्या असलेल्या एका निषादाने बाण मारून त्या जोडप्यापैकी नराचा अकारण वध केला. बाणाने जखमी झालेल्या आणि वेदनांनी तडफडणाऱ्या प्रियकराला पाहून त्याची पक्षीण प्रेयसी करून स्वरात विलाप करू लागली. वाल्मिकींना ते दृश्य पाहून अतिशय करुणा वाटली आणि त्यांच्या मुखातून सहजस्फूर्त उद्गार बाहेर पडले : ‘हे निषादा, ज्या अर्थी क्रौंच जोडप्यापैकी काममोहित झालेल्या एका निरपराध पक्ष्याचा तू अकारण वध केला आहेस त्या अर्थी तुला (ह्या जगात) कधीही प्रतिष्ठा मिळणार नाही.’
मा नषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वती समाः |
यत्क्रौंचमिथुनादेकमधी: काममोहितम् ||

पण हे सहजस्फूर्त उद्गार नेहमीच्या पद्धतीने उच्चारले गेले नव्हते; ते होते छंदोबद्ध आणि म्हणूनच अभिनव. कवितेचा तो पृथ्वीवरील जन्म होता. देवांनी तत्काळ पुष्पवृष्टी करून अनुष्टुभ वृत्तातील कवितेचा जन्म साजरा केला, तर साक्षात ब्रह्मदेवांनी त्यामागे आपली प्रेरणा आहे हे वाल्मिकींना सांगून कवितेला आशीर्वाद दिला. पण आपल्या उद्गाराच्या अभिनव अशा छंदोबद्धतेने आश्चर्यचकित झालेल्या वाल्मिकींनी प्रश्न केला, “मी जे उच्चारले ते काय आहे?” (किम् इदम् व्याहर्तम मया|)
अशाप्रकारे वाल्मिकींच्या छंदोबद्ध उद्गाराने कवितेचा आणि ‘किम इदम्’ ह्या प्रश्नाने समीक्षेचा जन्म झाला आणि तोही लगेचच. असे सांगितले जाते. या पुढे जाऊन असे लक्षात येते की

“यावज्जीवेत् सुखं जीवेत, नास्ति मृत्युरगोचरः |
भस्मी भूतस्य देहस्य पुनरागमनं कृतः|”

हा चार्वाकांचा श्लोक काय कविता नाही काय? तर कविताच आहे आणि तीही वाल्मिक ऋषींच्या आधीची आहे. ती अशी की, नवव्या शतकाच्या अखेरीस झालेल्या जयंत भट्ट या नैयायिकाच्या ‘न्यायमंजिरी’त हा पूर्ण श्लोक आला आहे. नंतर मात्र या श्लोकाला प्रक्षिप्त करून चौदाव्या शतकातील माधव विद्यारण्य या वेदांत्याने ‘नास्ति मृत्युरगोचरः’ हा श्लोकार्ध गाळून ‘ऋण कृत्वा धृत पिबेत’ हे बदनाम वचन घुसविले. मात्र हा श्लोक छंदोबद्ध कविताच आहे. चार्वाकाचा उल्लेख महाभारतात येतो याचा अर्थ महाकाव्य लिहिण्याआधी चार्वाकाचे साहित्य उपलब्ध होते. ते जनमनात आधीच पोहचले होते. याचाच अर्थ वरील “मा नाषाद....” या पहिल्या कवितेच्या आधीही कविता सापडते आणि हा मान चार्वाकाला जातो. मग आद्य कवी चार्वाकच असे म्हणता येईल.
भारतीय तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक देवीप्रसाद चटोपाध्याय यांच्या ‘लोकायत’ या ग्रंथात आणि इतरत्र दर्शन शास्त्राच्या अभ्यासकांनी जो निष्कर्ष मांडला आहे तो वेदाचा आरंभ ऋगवेद होय आणि इ. स. च्या पंधराशे वर्ष आधीचा कालखंड सांगितला जातो. ज्या गीतेवर शंकराचार्यांनी भाष्य लिहिले ‘शांकरभाष्य’ ते इ.स. च्या ९ व्या शतकात लिहिले. त्या आधी ८०० किंवा ९०० शे वर्ष आधी खुद्द श्रीकृष्णाने गीता सांगितली असे सांगितले जाते. याचाच अर्थ महाभारताचा कालखंड हा इ.स. पूर्व ८ वे किंवा ९ वे शतक सांगितले जाते. महाभारतात चार्वाकाला भर सभेत जिवंत जळल्याचा व त्याच्या लोकायत दर्शनाचा उल्लेख येतो म्हणजे महाभारताच्या आधी चार्वाकाचा कालखंड गृहीत धरता येतो. म्हणजेच वेदाच्या प्रारंभीच चार्वाकाने समाजातील विषमव्यवस्थेला कडाडून विरोध केला. हे उघड आहे.  गीतेचे सूत्रबद्धरूप पहिल्यांदा लिहिले गेले ते बादरायणी यांच्या ‘ब्रह्मसूत्र’ ग्रंथाच्या रूपाने तो इ. स. च्या पहिल्या शतकात.
या सगळ्या संदर्भावरून असे लक्षात येते की आद्य कविता कोणती? तर, चार्वाकाच्या लोकायत दर्शनशास्त्रातील श्लोक ही छंदोबद्ध रचनाच आद्य काव्य ठरते. आणि वरील भारतीय साहित्येतीहासात आद्य काव्याचे प्रमाण सांगितले जाते ते याकालानुक्रमाच्या पुराव्यावरून फोल ठरते. यानंतरही अनेक बुद्ध वचने मौखिक रूपाने जनमनात पसरलेली होती ती ‘उदान’ म्हणून प्रसिद्ध आहे ही पाली भाषेतील कवनेच आहे. त्यातून बुद्ध तत्त्वज्ञान ओतप्रोत भरलेले आहे जे अखिल मानवांसाठी आज आणि उद्याही अत्यावश्यक आहे. मानवाच्या कल्याणासाठी एकमेव आहे.
(संदर्भ :- भारतीय तत्त्वज्ञान- एस. जी. सरदेसाई)

“आगही दामे-शुनीदिन जिस कदर चाहे बिछाए,
मुद्दआ अन्का है अपने आलमें-तकरीर का |”
(तू आपल्या जाणिवेचे जाळे वाटेल तेवढे पसरव तरी पण माझ्या म्हणण्याचा मथितार्थ एका चिमणीप्रमाणे आहे. तुझ्या जाळ्यात ती फसणार नाही.)

Comments

Popular posts from this blog

महिला सक्षमीकरण सुरु आहे. . .

|| सृजनवेध || महिला सक्षमीकरण सुरु आहे. . . - डॉ. पद्माकर तामगाडगे महिला सक्षमीकरणाची प्रक्रिया केव्हा पासून सुरु झाली ? याचा विचार केल्यास. लगेच ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आठवतो आणि त्याच बरोबर आठवतो त्या घटनेमागील इतिहास. क्लारा जेटकिन या रूसी महिलेने सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला अधिवेशनाचा प्रस्ताव ठेवला होता . दर वर्षी ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जावा. तिने जगातील सर्व महिलांना आवाहन केले आणि पुरुष आणि महिलांमध्ये कुठल्याही प्रकारची दरी निर्माण होऊ नये. जर पुरुष झगडा करीत असेल तर महिलांनी शांत राहून सामंजस्याने विचार करून, शांतपणे लढावे. आणि मग १९११ पासून १९१५ पर्यंत सातत्याने ८ मार्च हा महिला दिवस म्हणून जगभर साजरा केला गेला. महिलांना संगठीत करण्यासाठी सेंट पीटर्सबर्ग शहरात ‘राबोनित्सा’ पत्रिका काढली गेली. आणि इथूनच महिलांवरील होणारे अन्याय अत्याचार, असमानता यांच्या विरोधात एक सक्षम नेतृत्व उभारल्या गेले. पहिल्या महायुद्धातील कालावधीत ओस्लो(नार्वे) मधील महिलांनी युद्धाचा निषेध दर्शविला, रशियन क्रांतीची सुरुवात ८ मार्च १९१...

मास्तर. ...

मास्तर... मास्तर..... समजूनच नाही राह्यलं पेरलं तेवढंय नायी उगवत लेकी-बायकोचंत सोडाच पण दोन येळंचं कसं भागन मास्तर तुम्हीच सांगा प्रॉब्लेम कोठी असंन? सालं वर्षानुवर्ष संकरीत बियाने दगा देऊन रायले आंब्याच्या झाडाले कावूनसन्या फनसं येऊन रायले आन बाभळीच्या झाडाले देखने फुलं येऊन रायले बापाच्या हातानं वावर फुलारलं होतं बाप गेल्यावर भावानं विदेशी एंड्रेल फवारली तवापासुनस काळी माय वांझोटी झाली रातदिस मशागत करून बापानं धम्माची टॉनिक पाजली होती तवा कणसं टरारून वर येत होती  भावा-भावात हिशे-वाटणी झाल्यावर  सुपीक माह्य अन कोरडं ठाण त्याचं? कायबी कळत नाय या फरकाचं  रातच्याले माह्या पिकावर  सोडते चराले अमेरिकन सांड आन डुर्कावते दोन्ही पायात हिल्गवून आंड मास्तर आता तुम्हीच सांगा  कुठवर देऊ या वावरावर ध्यान का घेऊ दोऱ्यात अडकवून मान? तू एक कर..... रगारगात आंबेडकर पेर बघ कसं डौलदार पिक येईल मनूच्या भूमीला भडास दे ! बघ कसे क्षणार्धात ठीक होईल. - पद्माकर तामगाडगे 

पद्माकर तामगाडगे यांचा "ग्लासनोस्त" कवितासंग्रह प्रकाशित

"ग्लासनोस्त"  या कवी पद्माकर तामगाडगे यांच्या कविता संग्रहाचे नुकतेच डॉ. बी. जी. पगारे यांच्या हस्ते मुंबई येथे  प्रकाशन झाले. प्रज्ञाप्रबोध प्रकाशन, सांगली प्रकाशनाने आयएसबी एन  क्रमांक देऊन "ग्लासनोस्त" हा कवितासंग्रह प्रकाशित केला. ग्लोबल कोलाज मांडणारी ही कविता मानवतेचे धगधगते वास्तव  चित्रित  करते.  सुप्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी "बोलणा-या निखा-याची कविता. . ." म्हणून नव्या समतामुलक समाजाचे दिशादिग्दर्शन ही पद्माकर तामगाडगे यांची  कविता करते  शिवाय तरुण पिढीलाही नवी वाट दाखवते. अशी नव्या पिढीची, नव्या वळणाची संयत कविता वाचकांनी मुळातच जरूर आस्वाद घ्यावा. कविता संग्रहाचे मुखपृष्ठ सुप्रसिद्ध चित्रकार बळी खैरे यांनी अतिशय बोलके काढले आहे. कवितेच्या "ग्लासनोस्त" या नावापासून,   दर्शनी भागापासूनच उत्सुकता निर्माण करणारा "ग्लासनोस्त" हा कवितासंग्रह एकदा तरी सर्व रसिक श्रोत्यांनी जरूर वाचवा.