Skip to main content

Posts

Showing posts from September, 2012

महिला सक्षमीकरण सुरु आहे. . .

|| सृजनवेध || महिला सक्षमीकरण सुरु आहे. . . - डॉ. पद्माकर तामगाडगे महिला सक्षमीकरणाची प्रक्रिया केव्हा पासून सुरु झाली ? याचा विचार केल्यास. लगेच ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आठवतो आणि त्याच बरोबर आठवतो त्या घटनेमागील इतिहास. क्लारा जेटकिन या रूसी महिलेने सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला अधिवेशनाचा प्रस्ताव ठेवला होता . दर वर्षी ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जावा. तिने जगातील सर्व महिलांना आवाहन केले आणि पुरुष आणि महिलांमध्ये कुठल्याही प्रकारची दरी निर्माण होऊ नये. जर पुरुष झगडा करीत असेल तर महिलांनी शांत राहून सामंजस्याने विचार करून, शांतपणे लढावे. आणि मग १९११ पासून १९१५ पर्यंत सातत्याने ८ मार्च हा महिला दिवस म्हणून जगभर साजरा केला गेला. महिलांना संगठीत करण्यासाठी सेंट पीटर्सबर्ग शहरात ‘राबोनित्सा’ पत्रिका काढली गेली. आणि इथूनच महिलांवरील होणारे अन्याय अत्याचार, असमानता यांच्या विरोधात एक सक्षम नेतृत्व उभारल्या गेले. पहिल्या महायुद्धातील कालावधीत ओस्लो(नार्वे) मधील महिलांनी युद्धाचा निषेध दर्शविला, रशियन क्रांतीची सुरुवात ८ मार्च १९१...

माझा देश श्रीमंत आहे ! पण . . .

|| सृजनवेध || माझा देश श्रीमंत आहे ! पण . . .                                                              - डॉ. पद्माकर तामगाडगे देशाच्या आर्थिक विकासात देशाकडे असणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्तीचा सर्वाधिक व महत्वाचा सहभाग असतो. भारत हा कृषिप्रधान देश आहे. जमिनीची सुपीकता इतर देशांच्या तुलनेत चांगली असली तरी जागतिक स्पर्धेत लोकसंख्येच्या तुलनेत या साधनसं पत्तीचा विनियोग व्यवस्थापनेच्या अभावी झालेला नाही. त्यामुळे जगात विकसनशील देश म्हणूनच भारताला आजचे स्थान मिळाले आहे. भारतात नैसर्गिक साधन संपत्तीचा मुबलक साठा आहे. अनेक देश भारतातील ‘पेटंट’ घेऊन जातात आणि आपण त्यांच्या कडे फक्त पाहातच राहतो. ही संपत्ती वनसंपत्ती, धातू, मूलद्रव्ये, जमीन, महासागर, वातावरण कोणत्याही माध्यमाच...

भारतीय शिक्षण : दर्जा आणि गुणवत्ता ?

  || सृजनवेध || भारतीय शिक्षण : दर्जा आणि गुणवत्ता ? डॉ. पद्माकर तामगाडगे, जुन्या श्रुती आणि स्मृतीपुराणोक्त जीवन शैलीला चिकटून बसलेली मानसिकता   अपल्या भारतीय संस्कृतीत, समाजात अजूनही दिसते.   या गोष्टीला खतपाणी घालणारे सण-समारंभ, उत्सव, धार्मिक चालीरीती, प्रथा आजही आपल्याकडे दिमाखात साजऱ्या होताना दिसतात. चंगळवाद तर मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. मध्यमवर्गीयांचा व त्यांच्या   अज्ञानाचा फायदा करून घेणारे स्वार्थी राजकीय पक्ष, सत्तालालसी समाजकारणी, भावनांचा बाजार मांडून सत्तेचे कुंटणखाणे स्थापून गोर-गरिबांना नादी लावून स्वतःची लाल करून घेतात. परंतु या सर्व घटनांचे येणाऱ्या पिढ्यांवर होणारे दुष्परिणाम जगून झालेल्यांनी म्हणजेच तथाकथित प्रौढांनी कधी तरी नव्या पिढीसाठी समजून घेतले पाहिजे की नाही. केवळ प्रौढांनाच हा दोष देता येईल असेही नाही, तर इथल्या संस्कृतीच्या नावाखाली इतर समाजाची दडपशाही करणाऱ्या समाज-सांस्कृतिक संघटनांनीही उद्याचा भारत सक्षम उभारण्यात दूरदृष्टी ठेऊन सर्जनशीलता स्वीकारली पाहिजे. कारण परिवर्तन हा सृष्टीचा नियमाच आहे.   ...