Skip to main content

Posts

Showing posts from October, 2012

स्मरण एका युद्धाचे : भारत-चीन १९६२

स्मरण एका युद्धाचे : भारत-चीन १९६२ - डॉ. पद्माकर तामगाडगे       भांडण घरातील असोत किंवा राष्ट्रांची संहार, विनाश, अशांती होणारच. भांडणामुळे आपला प्रतिस्पर्धी व आपण स्वत:ही सुखी होत नाही. त्यात दोघांचेही नुकसानच आहे. म्हणूनच जगाला भारतातून शांतीची शिकवण देणारा बुद्ध आज सर्व राष्ट्रांना हवाहवासा वाटतो. कारण शांतीचे साम्राज्य येईल तेव्हाच सुख, समृद्धी आणि विकास सुद्धा साधने शक्य होते. आपल्या जीवनाच्या ऐन उमेदीत रोहिणी नदीचा वाद गौतमाने मोठ्या चातुर्याने सोडविला तो मध्यममार्ग जगाला आजही तितकाच पोषक आहे. मात्र याचा अर्थ असा घेऊ नये की समस्येला घाबरून ही सोईस्कर पळवाट आहे. शांती हे तत्व बुद्धाने माणसांच्या हितासाठी, त्याच्या सर्व सुखासाठी सांगितलेला आहे. त्यात वैश्विकता आहे. प्रत्येक जीवाचं रक्षण आहे. जगण्यासाठी सोईस्कर असा धम्माचा तो मार्ग आहे. म्हणून विश्वशांतीचा प्रणेता बुद्ध महान आहे.           २० ऑक्टोबर १९६२   ला भारत-चीन युद्धाचा प्रारंभ झाला आणि सलग एक महिना ते सुरु राहिले. २० ऑक्टोबर २०१२ ल...

. . . येणाऱ्या सळसळत्या भविष्या

. . . येणाऱ्या सळसळत्या भविष्या -डॉ. पद्माकर तामगाडगे, ९८६९५८१६४७           जगाने कूस बदलली तो काळ आपणास सांगता येतो. १९६० नंतर हे जागतिक स्थित्यंतर प्रकर्षाने सर्व स्तरात जाणवायला लागले. भारतातील सर्वसामान्य माणसांपासून ते नवकोट नारायणांपर्यंत सगळ्याच वर्गीय पातळ्यांना कमी-अधिक प्रमाणात या झाला जाणवायला लागल्या होत्या. त्या तीक्ष्ण होऊन आता असह्य व्हायला लागल्या आहेत. म्हणून लोकांची जगभरातील ओरड प्रत्येकाच्या कानापर्यंत ऐकायला येत आहे. १९६० नंतर औद्योगिक क्रांतीबरोबरच ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकास पाऊन सर्वसामान्यांच्या दारात उभे राहिले. जगात आर्थिक महासत्ता होण्याच्या स्पर्धेत प्रत्येकच देश सहभागी होऊ लागला आणि वरकरणी नकार दिसणारा देशही प्रत्येक देशाला स्पर्धकच समजायला लागला. खाऊजा धोरण आले म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण आणि सातासमुद्रापल्याडच्या सीमा क्षणात जवळ आल्या हे विश्व आता ग्लोबलकूस झाले. आंतरराष्ट्रीय व्यापार-उद्दीम, विविध करार झाले. एकमेकांसाह्य करू अवघे धरू सुपंथ म्हणत हातात हात घा...

हिमालया माफ कर !

               हिमालया माफ कर ! हिमालया, तू इतका मोठा ? साऱ्या पर्वतांना लाजविणारा इतिहासाची साक्ष ठेऊन; कित्त्येक शतकं गाजविणारा. तुझ्या हिमतीचीही द्यावी दाद. जगाचा अनभिषिक्त सम्राट सूर्य त्यालाही थोपवून धरलंस तू आणि आजही हे अजिंक्यपद तुलाच? हिमालया, तू नाहीस नुसत्या माती-गोटयाचा तू नाहीस केवळ उत्तुंग एकसंघ पाषाणाचा तू नेसलेली हिमवस्त्र उगीचच नाहीत, तू नाहीसच केवळ अचेतनाचा पुतळा, तू आहेस सर्जनतेचा महामेरू, तू प्रसविल्यास अनेक हिमनद्या, तुझ्या आज्ञेने थोपवून धरले उद्दाम मेघ, आणि तुझ्याच अंशातून जन्मल्या अनेक गंगा तू शांतीचा विजिगीषू स्तूप आहे. तू सहनशीलतेचा कळस आहे. असंख्य तुफान, वादळवारे तुला थरकापले, तरी तू तसाच अविचल आहेस. हिमालया, तू इतिहासाचा खरा साक्षी तुझ्याच देखत म्लेंच्छ इथे आले तुझ्या परोक्ष पानिपत घडले तू पाहिलेस अनेक रणसंग्राम तुझ्याच नजरेदेखत घडला इतिहास. तू पाहिली आहेस देशाची फाळणी जातीजातीत धर्माधर्माची महापातके आणि इथेच विश्वशांतीचा प्...

अभिसरणाच्या व्यूहात माणूस

|| सृजनवेध || अभिसरणाच्या व्यूहात माणूस - डॉ. पद्माकर तामगाडगे, ९८६९५८१६४७ हिप्पोलाईन तेन या समाजशास्त्रीय अभ्यासकाने समाजाचे होणारे स्थित्यंतर आपल्या ‘समाजशास्त्रीय सिद्धांता’च्या माध्यमातून पटवून दिले. त्यात त्याने वंश ( Race ),परिस्थिती (milieu) आणि युगप्रवृत्ती (Moment) या तीन घटकांवर समाजाचे परिवर्तन होत हे दाखवून दिले. बुद्धाने सांगितलेले सर्वकालिक सत्य म्हणजे ही सृष्टी परिवर्तनशील आहे. या सृष्टीतील सर्व घटक हे अनित्य आहे आणि याचे प्रत्यंतर आपणास लौकिक जीवन जगतांना येत असते. जगाने कूस बदलली तो क्षण कोणता? हे सांगता येते. त्यासाठी तेनच्या समाजशास्त्रीय सिद्धांताचा आधार घेत आपणास उत्तरे मिळू शकतील. साधारणतः हे जग क्रमाक्रमाने विकसित होत गेले. जगातील प्रत्येक देशाची परिवर्तनाची गती वेगवेगळी असली तरी झपाट्याने जग समांतर पद्धतीने बदलायला लागले तो काळ साधारणतः १९६० नंतर . जगातील मागास देश पाश्चात्य आणि पौर्वात्य जगाच्या पदराला धरून हळूहळू   परिवर्तीत व्हायला लागले. माणूस आपल्या बुद्धीचा वापर जेवढा जास्त करेल तेवढा विकास होईल. म्हणूनच दुसऱ्या महायुद्धात बेच...